माझं मत - बोल धडक ...{पोस्ट क्रमांक ५ } - २० मे २०२५)
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीत १८ मे २०२५ रोजी घडलेली घटना दुर्दैवी होती हे खरे. एका रुग्णाचा मृत्यू झाला. कारण काय? रुग्णवाहिकाचालकाची हलगर्जी. नातेवाईकांनी थेट तक्रार केली आणि समाजमाध्यमांपासून वृत्तपत्रांपर्यंत यावर संताप व्यक्त झाला.
घडलेली दुर्दैवी घटना केवळ एक अपवादात्मक प्रकार असला, तरीही या घटनेनंतर प्रशासनाने घेतलेली तत्काळ कारवाई आणि रुग्णसेवेविषयी दाखवलेली संवेदनशीलता ही अत्यंत स्तुत्य आहे. 'रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू' झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आणि त्यावर अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे Shivaji Sukre यांनी कोणतीही वेळ न दवडता तात्काळ चौकशीचे आदेश देत दोषी चालकावर चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई केली. आणि चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना झाली.
आजच्या काळात जेथे अनेकदा प्रशासनाकडून कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जाते, तिथे डॉ. सुक्रे यांची कामातील तत्परता आणि मानवी मूल्यांना दिलेले महत्त्व याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. डॉ. शिवाजी सुक्रे हे नाव गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय प्रशासनात ‘कार्यक्षमते’चे प्रतिक बनून झळकत आहे.
ही आहे खरी 'Accountability' – जबाबदारीची भावना
कारवाई झाली, ती त्वरित. झाकून न टाकता. गुन्हा झाला, तर त्याला शिक्षा ठरली. ही घटना एक अपवाद होती. पण डॉ. सुक्रे यांचे यावर उत्तर ‘सिस्टम क्लीन’ करण्याचे ठरले. अधिष्ठाता पदावर आलेल्या डॉ. सुक्रे यांनी 'माझं रुग्णालय' हे तत्त्व स्वीकारले आहे. आजच्या घडीला घाटीत रुग्णसेवेसाठी ७१० कोटी सर्जिकल इमारतीसाठी, २५ कोटी सीसीयू युनिटसाठी आणि ४५ कोटी ईडब्ल्यूएस रुग्णांसाठी असे भरीव निधी केंद्र व राज्य सरकारकडून मंजूर झाले आहेत. हे सहजासहजी घडलेले नाही. हे प्रशासन, राजकीय इच्छाशक्ती आणि नेतृत्व एकत्र आल्यामुळे शक्य झाले आहे.
शिस्तबद्ध कामकाजावर आरोपांची चिखलफेक नको
वास्तविकता डॉ. सुक्रे हे सामान्य रुग्णाच्या वेदनेला समजून घेणारे नेतृत्व आहे. एखाद्या गरीब रुग्णाकडे औषधासाठी पैसे नसतील तर ते स्वतःच्या खिशातून पैसे देऊन औषधे पुरवतात. हे असे नेतृत्व आहे जे ‘सिरिअसली’ रुग्णसेवेला आपले कर्तव्य समजते, केवळ ‘पोस्ट’ म्हणून नाही, तर ‘प्रोमिस’ म्हणून.
पण जेव्हा एक कर्मचारी चूक करतो, तेव्हा त्याचे खापर सगळ्या यंत्रणेवर फोडणं कितपत योग्य?
चांगल्या प्रशासनावर, प्रामाणिक डॉक्टरांवर, रात्रंदिवस झगडणाऱ्या नर्सेसवर आणि आपल्या रुग्णालयातील शिस्तबद्ध कामकाजावर अशीच सतत आरोपांची चिखलफेक होत राहिली तर कोण काम करायला पुढे येईल?
ही घटना केवळ 'एक बिघडलेली कडी' होती. पण साखळी तुटू दिली गेली नाही, ती तत्काळ प्रतिसादामुळे. आपण फक्त एवढं लक्षात घेतले पाहिजे. जेव्हा काही चुकतं तेव्हा संपूर्ण व्यवस्था वाईट नसते. चूक झाली ते मान्य करून कारवाई करणे, हीच तर खरी व्यवस्थेची ताकद असते. डॉ. शिवाजी सुक्रे हे याचे उत्तम उदाहरण आहेत.
आज घाटीमध्ये दररोज हजारो रुग्णांची तपासणी होते, गंभीर शस्त्रक्रिया पार पडतात, वैद्यकीय शिक्षण घेतले जाते, संशोधन चालते. पण एक अपवादात्मक घटना संपूर्ण प्रगतीवर पाणी फेरते.
पण त्याचवेळी योग्य काम करणाऱ्या नेतृत्वाला पाठबळ द्यायचे धाडसही आपण दाखवायला हवे. डॉ. सुक्रे यांच्या रूपाने घाटी रुग्णालयात नवा अध्याय सुरू झाला आहे. पारदर्शकता, जबाबदारी, आणि मानवी संवेदना यांचा संगम. ही ऊर्जा फक्त टीकेने नाही तर सकारात्मक पाठींब्याने टिकवता येईल.
तुषार विष्णू वखरे
मो- 9881177933
#GMCH #aurangabad #maharashtra #BreakingNews #तुषारवखरे #tusharwakhare #education #medicalcollege Shankarrao Adsul Shivaji Sukre
No comments:
Post a Comment